दै.झुंजार मावळा चे संपादक दत्तात्रय सुर्वे यांना गोवा रत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार
पुणे(प्रतिनिधी) :-पुरस्कार विजेत्यांची राष्ट्रीय चळवळ असलेल्या ""भारतीय पुरस्कार विजेते संघ"या सामाजिक व सेवाभावी संस्थेच्या वतीने या वर्षीचा सर्वोत्कृष्ठ व अती महत्वाचा मनाला जाणारा "गोवा रत्न आंतर राष्ट्रीय पुरस्कार पुणे येथील दै.झुंजार मावळा चे संपादक श्री.दत्तात्रय सुर्वे यांना गोवा येथे नुकताच शिवसेनेचे उपनेते ,माजी आमदार ,आनंत तरे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
गोवा युनिव्हरसिटी च्या दि इंटर नस्नल सेंटर डोनापावला येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास शिवसेना उपनेते अनंत तरे ,श्री .जयेंद्र खुणे, चित्रपट निर्माते प्रसाद तारकर ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शांताराम कारंडे ,महाराष्ट्र कोळी समाज संघटक दीपक सेठ भोइर,गोवा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्धन भंडारी, आर.सी.एफ कंपनीचे उपाध्यक्ष रामचंद्र नाईक, डॉ.शेखर धुमाळ ,अभिषेख अलगीकर, डॉ .सुधीर तारे, गायक प्रवीण कुंवर ,जगदीश पाटील,कु. भारती मढवी,डॉ.संजुक्ता महापात्रा,वर्षा विद्या विलास, भारतीय पुरस्कार विजेते संघाच्या सरचिटणीस सौ. सारिका पाटील ,बेळगावचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.मधुकर ,शशिकांत खानविलकर ,बाळकृष्ण वाणी ,कारण पाटील आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
"गोवा रत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार" विजेते दै.झुंजार मावळा चे संपादक दत्तात्रय सुर्वे यांनी सन .१९८२-८३ मध्ये मुंबई येते सर्वप्रथम "दै.मुंबई सकाळ " येथे पत्र लेखनाने आपल्या पत्रकारितेस सुरुवात केली .त्यानंतर पुणे येथे आल्यानंतर "श्रमिक विचार "या दैनिकातील एका लेखाने त्यांना जीवघेण्या हल्ल्याला सामोरे जावे लागले.सामाजिक व विकासात्मक पत्रकारिता हा धागा धरून त्यांनी पुढील वाटचाल चालू ठेवली .श्री.दत्तात्रय सुर्वे यांनी पुणे येथे सर्वप्रथम दै.तरुण भारत,रामभूमी,दै.गावकरी,दै.प्रहार, केसरी,प्रभात,सांज समाचार, पुढारी, स्वराज्य, संध्या ,वर्तमान ,राष्ट्रतेज, मार्मिक, गावकरी ,लोकायत आदी दैनिकात लेखन केले.त्यानंतर दै.सामना चा पुणे जिल्ह्यातील प्रारंभ त्यांनी श्री.हरीश केन्ची,राज्जाभाऊ रायकर यांच्या माध्यमातून केला .काही काल दै.सामानाचे वितरण देखी केले.ते मुळशी तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत होते.
दत्तात्रय सुर्वे यांनी १९८९ साली प्रथमता: मुळशी तालुक्यातून "पाक्षिक शिवतेज"सुरु केले.त्याचे प्रकाशन दादा कोंडके यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.१९९३ साली त्यांनी मुळशी तालुक्याचे मुखपत्र ठरावे आसे "साप्ताहिक मुळशी दिनांक" शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते दि.१७ ऑगस्ट १९९३ रोजी मातोश्री बंगल्यावर केले.नंतर २००७ मध्ये "मासिक शिवमार्ग" साप्ताहिक "शिवराष्ट्र" आणि १९फेब्रुवारी २०११ रोजी दैनिक "झुंजार मावळा" या ग्रामीण भागातून प्रसिद्ध होणारे मराठी दैनिक सुरु करून एक नवक्रांती केली .कोणतेही आर्थिक व राजकीय पाठबळ नसताना ते हे दैनिक "झुंजार मावळा"यशस्वीपणे चालवीत आहेत.दत्तात्रय सुर्वे प्रकाशित करीत असलेल्या "शिवतेज" आणि "शिवमार्ग" दिवाळी अंकास आजवर सुमारे १५च्या वर विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.तसेच ते महाराष्ट्र साप्ताहिक संपादक परिषद ,पुणे जिल्हा अध्यक्ष ,पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ,आल इंडिया स्माल अंड मेडियम न्यूज पेपर आसोसिअशन चे सदस्य म्हणून देखील पत्रकारितेची सेवा करीत आहेत.सुर्वे यांचा अनेक सामाजिक ,राजकीय संस्थांशी जवळचा समंध असून त्याचे पदाधिकारी ,सदस्य म्हणून यशस्वीपने जबाबदारी पार पाडीत आहेत.
श्री .दत्तात्रय सुर्वे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मुळशी तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून राजकारणातही आपला वेगळा ठसा उमटविला आहे.मागील पंचायत समिती च्या निवडणुकीत ते निवडून आले होते.त्यांनी पत्रकारितेच्या जोरावर "पुणे-ताम्हिणी-कोलार "हा महामार्ग तडीस नेला.त्यांनी केलेल्या काही कामा मध्ये पुढील काही कामांचा उल्लेख करता येईल...
१) पौड ग्रामीण रुग्णालय इमारत ...२) भरे येथील आय .टी.आय .इमारत..
३) मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ४) मुळशी धरणग्रस्थानचे अनेक प्रश्न ...
५) टेमघर धरणं नामकरण ......इत्यादी ...
भारतीय पुरस्कार विजेते संघाने श्री.दत्तात्रय सुर्वे यांना "गोवा रत्न आंतर राष्ट्रीय पुरस्कार "देऊन गौरविल्यानेसंपूर्ण मुळशी तालुक्यातून त्यांचे आभिनंदन केले जात आहे.अनेकांनी दूर ध्वनिवरून त्यांना शुभेच्या दिल्या आहेत.